Ad will apear here
Next
‘फ्रेंडशिप डे’ला झाडांशी मैत्री
सिद्धेश धुळपरत्नागिरी : ऑगस्ट महिन्याची सुरुवात झाली, की तरुणाईला वेध लागतात ते ‘फ्रेंडशिप डे’चे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी आपल्या मित्र-मैत्रिणींना ‘फ्रेंडशिप बँड’ बांधून हा दिवस साजरा केला जातो; मात्र या वर्षी रत्नागिरीत हा दिवस झाडांशी मैत्री करून साजरा केला जाणार आहे. त्यासाठी येथील पर्यावरणप्रेमी तरुणांनी पुढाकार घेतला आहे.

या वर्षी फ्रेंडशिप डे सहा ऑगस्ट रोजी आहे. त्या दिनाचे औचित्य साधून पुणे येथील हरित मित्र परिवार आणि ‘दी गिफ्ट ट्री प्रोजेक्ट’ यांच्यामार्फत रोपांचे मोफत वाटप केले जाणार आहे. दोन महिन्यांत १० हजार रोपांचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले असून,  रत्नागिरीतील सिद्धेश धुळप या तरुणाच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यापूर्वी सिद्धेशने रत्नागिरी शहरात पाच हजारांहून अधिक रोपे मोफत वाटली असून, ‘सीडबॉल’ कार्यशाळाही आयोजित केली होती. आता ‘चला करू या झाडांशी मैत्री’ असे म्हणत सिद्धेश झाडांसोबत ‘फ्रेंडशिप डे’ साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे.

'दी गिफ्ट ट्री प्रोजेक्ट'अंतर्गत रोपांचे वाटप करताना सिद्धेश धुळप.याबद्दल माहिती देताना सिद्धेश म्हणाला, ‘माझ्या आईला झाडांची खूप आवड आहे. वेगवेगळ्या झाडांच्या फांद्या लावून जगवणे, तसेच मिरची, टोमॅटो, गोंडा, गुलाब, शेवगा अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची लागवड तिने केली आहे. तिच्याकडूनच मला या उपक्रमासाठी प्रेरणा मिळाली आणि झाडांशी मैत्री होत गेली. खरे तर झाड हा आपला जन्मापासूनचा मित्र; मात्र या मित्राची जाणीव उन्हाळ्यात सावलीसाठी किंवा फुला-फळांसाठीच होते. एरव्ही हा मित्र दुर्लक्षितच असतो. म्हणून या ‘फ्रेंडशिप डे’निमित्त तरुणांसह सर्वांनीच ‘झाडं लावू या आणि झाडं देऊ या’ अशी संकल्पना सुचली आणि ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न करत आहे.’

या उपक्रमांतर्गत दोन महिन्यांत सुमारे १० हजार रोपे मोफत देण्यात येणार आहेत. त्यासाठी नावनोंदणी केली जाणार असून, मार्गदर्शनही केले जाणार आहे. या कामी पुणे येथील हरित मित्र परिवाराचे महेंद्र घागरे यांचे विशेष सहकार्य लाभत असून, त्यांच्याबरोबरच निशांत नांदिवडेकर, ओंकार शिंदे, राहुल भाटकर, अमित देसाई, शिवाजी कारेकर, अभी कारेकर, योगेश मगदूम, अनघा निकम-मगदूम, सक्षम ग्रुप, स्रोत फाउंडेशन, राणे प्रतिष्ठान यांचे सहकार्य मिळत आहे, अशी माहिती सिद्धेशने दिली.

दरम्यान, हरित मित्र परिवार व गिफ्ट ट्री यांच्यामार्फत ‘झाड दत्तक योजना’ही राबविली जाणार आहे. ‘आपल्या घरी वाढलेली अतिरिक्त रोपे आम्हाला द्या; ती आम्ही ज्यांना हवी त्यांना देऊ,’ असे आवाहन करण्यात आले आहे. तुळस, कढीपत्ता, जास्वंद यांसारखी अनेक प्रकारची झाडे आपल्या दारात वाढतात. बऱ्याचदा आपण त्यांची छोटी रोपे व फांद्या तोडून टाकतो; मात्र अशा तोडलेल्या फांद्या टाकून न देता त्या दुसऱ्याला देऊन झाडं वाढवण्याचा हेतू यामागे आहे.

जंगलतोडीमुळे कमी होणारी झाडांची संख्या आणि त्यामुळे वाढत जाणाऱ्या पर्यावरणीय समस्या ही चिंतेची बाब आहे. भविष्यात उद्भवणारे धोके लक्षात घेऊन पर्यावरण संस्था आणि पर्यावरणप्रेमींकडून मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहिमा हाती घेण्यात येत आहेत. त्याचा चांगला परिणामही  दिसून येत आहे. अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वृक्षरोपणासारखे कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर, सिद्धेश आणि त्याच्या मित्रमंडळींतर्फे राबवला जाणार असलेला हा उपक्रमही चांगला विचार रुजवेल, अशी आशा आहे.

संपर्क :

सिद्धेश धुळप : ९९७०३ ४८१९७
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZUVBF
Similar Posts
‘उच्च शिक्षणासाठी सामाजिक संस्थांचा हातभार महत्त्वाचा’ पुणे : ‘शेतीविषयक शिक्षणामध्ये नाविन्यपूर्ण बदल केले जात आहेत. सरकारनेही चांगल्या योजना निर्माण केल्या आहेत. शिवाय, आपल्याकडे बहुतांश विद्यार्थी मुख्य व्यवसाय शेती असलेल्या भागातून येतात. मात्र, आर्थिक पाठबळाच्या अभावामुळे त्यांना उच्च शिक्षण घेण्यात अडचणी येतात. अशावेळी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या
भाताच्या आगरात जोंधळ्याचे चांदणे पालशेत (गुहागर) : भाताचे आगर अशी ओळख असलेल्या कोकणात खरीप हंगामात ज्वारीचे पीक घेण्याचा प्रयोग एका शेतकऱ्याने यशस्वी करून दाखवला आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यातील पालशेत येथील माधव वसंत सुर्वे असे त्या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे. कोकणात विशेषत: रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत खरीप
पुरंदरच्या तरुणांच्या ‘ऑस्करवाडी’ वेबसीरिजला जगभरातून उदंड प्रतिसाद पुणे : पुरंदर तालुक्यातील भिवरी या गावातील तरुणांनी बनवलेल्या ग्रामीण भागातील जीवनावर आधारीत ‘ऑस्करवाडी’ या मराठी वेबसीरिजला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून, त्यातील ‘शेतकऱ्यालासुद्धा इज्जत आहे’ या व्हिडिओला देशभरातून लाखो प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
फणशीबागेतील नदी पुनरुज्जीवित; सुशोभीकरणाचे थ्रीडी मॉडेल लवकरच रत्नागिरी : शहरातील फणशीबाग परिसरात असलेल्या नदीचे झरे गेल्या वर्षी श्रमदानाने मोकळे करण्यात आले होते. त्यात चांगला पाणीसाठा झाला होता. या प्रकल्पाचा पुढचा टप्पा म्हणून या परिसराचे सुशोभीकरण केले जाणार असून, त्याचे थ्री-डी मॉडेल शासकीय तंत्रनिकेतनमधील पाच विद्यार्थ्यांनी केले आहे. लवकरच ते सादर केले जाईल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language